वृत्तवेध न्यूज नेटवर्क
केडगाव | महाराष्ट्र राज्यावर कितीही मोठी वादळं आली तरी ती परतुन लावणारा महाराष्ट्राचा टायगर अभी जिंदा है,असे म्हणत खासदार अमोल कोल्हेंची केडगाव येथील भरसभेतून विरोधकांवर तुफान फटकेबाजी केली.
शरद पवार हि व्यक्ती नसून एक ताकद आहे. महाराष्ट्र राज्यावर आलेली संकटे झेलणारा सह्याद्री आहे. दिल्लीकरांनी जाणीवपूर्वक सातत्याने पवार साहेबांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला पण पवार साहेब दिल्ली पुढे कधीही झुकले नाही. पवार साहेब खंबीर आधार देणारा बाप आहे या बापाचे हात बळकट करा,यासाठी तालुक्यात तुतारीचा मतांच्या माध्यमातून असा आवाज घुमवा की कमळाच्या पाकळ्या विखरुण, घड्याळाचे काटेही बंद पडले पाहिजे.असे आवाहन खासदार अमोल कोल्हे यांनी तुतारीचे उमेदवार रमेश थोरात यांच्या प्रचारार्थ केडगाव येथील सभेत केले. यादरम्यान भाजपाच्या कारभारावर सडकून टीका केली. कोल्हे पुढे म्हणाले, पोलिसांवर दबाव टाकून सर्वसामान्य लोकांची गळचेपी करत आहे. सेवानिवृत्त कामगारांना ऐन दिवाळीत मिरची भाकरी खाण्यास लावणाऱ्याना धडा शिकवण्याची हीच वेळ आली आहे. तुतारीचा आवाज तालुक्यात घुमू द्या आणि रमेश आप्पांना प्रचंड बहुमताने विजयी करा.
यावेळी रमेश थोरात, डॉ. वंदना मोहिते, नामदेव ताकवणे, राजाभाऊ तांबे, बादशाह शेख, अनिल सोनवणे, आबा वाघमारे, उत्तम गायकवाड, बाळासाहेब कापरे यांनी आपल्या भाषणातून विरोधकांवर सडकून टीका केली. सूत्रसंचालन दिलीप हंडाळ यांनी तसेच आभार प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दौंड तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार यांनी केले.